dr. babasaheb ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर

dr.babasaheb ambedkar

dr. babasaheb ambedkar: 

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जवळील महू येथे झाला. अंबावडेकर कुटुंब हे मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंबावडे येथील असून बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ हे ब्रिटिश लष्करात सुभेदार या पदावर कार्यरत होते नंतर ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई असे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी संकपाळ उर्फ अंबावडेकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे चौदावे व शेवटचे अपत्ते होते.(dr. babasaheb ambedkar)

सुरुवातीचे जीवन:

बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ दापोली येथे झाले व त्यानंतर त्यांनी साताऱ्यातील अग्रिकल्चर स्कूल अर्थात एलिमेंटरी स्कूल येथे प्रवेश घेतला. या शाळेतील शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर या गुरुजींच्या प्रेमामुळे त्यांनी आपले आडनाव बदलून आंबेडकर असे केले.(dr. babasaheb ambedkar)

१९०५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. १९०७ रोजी मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. या शाळेतील शिक्षक केळुस्कर गुरुजी यांच्या प्रयत्नामुळे बाबासाहेब यांना बडोद्याचे राजे साहेबराव गायकवाड यांच्याकडून दरमहा २५ रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली, त्यामुळेच  त्यांना  एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला.

एल्फिन्स्टन कॉलेज मधून बाबासाहेब अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात सुद्धा नोकरी केली. २ फेब्रुवारी १९१३ रोजी बाबासाहेबांना पितृशोक झाला त्यामुळे त्यांनी त्यानंतर बडोदा जाण्यास नकार दिला.

उच्च शिक्षण:

सयाजीराव गायकवाड महाराजांकडून मिळालेल्या दरमहा रुपये २५ रुपयाच्या शिष्यवृत्तीच्या आधारे बाबासाहेब १९१३ ते १९१६ यादरम्यान अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. तिथून त्यांनी M.A  ही पदवी संपादन केली तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे नाव “एडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी” असे होते.(dr. babasaheb ambedkar)

१९१७ रोजी त्यांना कोलंबिया विद्यापीठाची पीएचडी ही पदवी मिळाली, पीएचडी साठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे नाव “द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी” असे होते.

पीएचडी पदवी मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला परंतु शिष्यवृत्तीचे मुदत संपल्यामुळे त्यांना परत भारतात परतावे लागले त्यानंतर त्यांनी मुंबईतील वर्स कॉलेज या खाजगी संस्थेत काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा या विषयाचे अध्यापन केले.

१९१८ मध्ये बाबासाहेब मुंबईच्या सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले, तेथे बाबासाहेब अर्थशास्त्र हा विषय शिकवत असत. त्यानंतर पुन्हा १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक सहाय्यामुळे बाबासाहेब पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठाची M.Sc. पदवी १९२१ मध्ये प्राप्त केली तसेच १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाची D.Sc. ही पदवी प्राप्त केली.(dr. babasaheb ambedkar)

बाबासाहेब १९२३ मध्ये बॅरिस्टर ची परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली तसेच मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे सुद्धा कार्य केले १९३५ ते १९३८ या काळात ते मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. बाबासाहेबांच्या प्रथम पत्नी रमाबाई यांचे १९३५ मध्ये निधन झाले त्यामुळे त्यांनी १५ एप्रिल १९४८ मध्ये डॉ. शारदा कबीर या विदुषेशी दुसरा विवाह केला लग्नानंतर डॉ. शारदा यांनी लगेच स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणा खालील प्रमाणे:

सन १९४६ मध्ये मुंबई येथे  पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थेमार्फत मुंबईत १९४० मध्ये सिद्धार्थ कॉलेज तर छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कॉलेजची १९५० मध्ये स्थापना करण्यात आली.(dr. babasaheb ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द: 

स्वातंत्रपुर्व मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती १९२६ ते १९३६ पर्यंत होती. १९२८ च्या काळात भारतात आलेल्या सायमन कमिशनला भारतभर विरोध होत असताना सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर अस्पृश्य बांधवांच्या समस्या मांडल्या होत्या.

१९३३ रोजी बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात ग्रामपंचायत बिलावर भाषण केले तसेच १९३०  ते १९३२ मध्ये लंडन येथे झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांना बाबासाहेब अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. २४ ऑक्टोबर १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा पुणे येथे ऐतिहासिक एकता करार झाला.

१९४२ ते १९४६ या काळात ते गव्हर्नर जनरल च्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून कार्यरत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांताच्या विधिमंडळातून घटना समितीवर निवडून आले होते, त्यांची संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून २९ ऑगस्ट १९४६ रोजी झाली होती. तसेच स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांची कायदामंत्री म्हणून सुद्धा निवड झाली.

१९४८ रोजी त्यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली, १९५१ रोजी हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी आपल्या कायदामंत्री या पदाचा राजीनामा दिला.(dr. babasaheb ambedkar) 

१९५२ च्या पहिल्या निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाने लोकसभेच्या ३४ जागा लढवल्या त्यापैकी दोनच सदस्य निवडून आले तर विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत २१५ जागा लढवल्या त्यापैकी बारा सदस्य निवडून आले १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून उभे राहिले होते पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते राज्यसभेवर निवडून गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले राजकीय पक्ष:


१)स्वतंत्र मजूर पक्ष: या पक्षाची स्थापना बाबासाहेबानी १५ ऑगस्ट १९३६ रोजी केली होती, या पक्षाने १९३७  च्या निवडणुका लढवून १३ जागा जिंकल्या होत्या.(dr. babasaheb ambedkar)

२)अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन: १८ जुलै १९४२ रोजी या पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केली या पक्षाचे मुख्यालय नागपूर येथे होते, नंतर याच पक्षाचे रूपांतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात झाले.

dr.babasaheb ambedkar

 

अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी येथे CLICK   करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था:


बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे झाली. समाज समता संघ या संस्थेची स्थापना १९४७ रोजी झाली.(dr. babasaheb ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता(१९३०), समता(१९५६).

१९९० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

२०१५ ते २०१६ हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ जयंती वर्ष सामाजिक समता व न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित असलेल्या पाच स्थळांना पंचतीर्थ  म्हणून दर्जा दिला, ती पंचतीर्थ खालील प्रमाणे:
१) महू बाबासाहेबांचे जन्मस्थळ. 
२) आंबडवे बाबासाहेबांचे मूळ गाव.
३) २६ अलिपुर रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथील निवासस्थान. 
४) १०  किंग्स एंड ब्रिज रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान.
५) चैत्यभूमी दादर मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ.(dr. babasaheb ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मपरिवर्तन:

 १३ ऑक्टोंबर १९३५ नाशिक येथील येवला येथे झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी प्रतिज्ञा घेतली की जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष विविध धर्मांचा अभ्यास केला व १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यामुळे १४ ऑक्टोंबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेबांना ब्रह्मदेशाचे चंद्रमणी महास्थवीर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली.(dr. babasaheb ambedkar)

६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यानंतर ७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई येथील दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल  गौरवोदगार

“दलितांचा मुक्तीदाता”  या शब्दात बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांचा गौरव केला. “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये मला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे” या शब्दात १९२० च्या मानगाव परिषदेत राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य बांधवांना संबोधित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *